आमदार रिपोर्ट कार्ड
मंजुरी मिळाली, भूमिपूजन झाले;
आता कामाची प्रतीक्षा
आमदार म्हणतात,
"सकाळ' हे लोकांना न्याय देणारे वृत्तपत्र आहे. आदिवासी भागांतील प्रश्न आणि नक्षलप्रभावित भागाबाबत विशेष लेखन करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या राजकीय कारकिर्दीत सकाळचा मोठा वाटा आहे.
आश्वासनांची पूर्तता करेन
विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांत बहुतांश लोकोपयोगी कामे हाती घेतली. काही पूर्ण झालीत. काही कामांना लवकरच गती देण्यात येईल. मतदारांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीन, असा विश्वास देतो. विविध विकासकामांकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. देवरी नगरपंचायतीच्या विकासासाठी सात कोटी रुपये, कचारगड पर्यटन क्षेत्रासाठी सात कोटींचा निधी, पालांदूर-चुबळी पुलासाठी तीन कोटी रुपये, आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह विकासासाठी 31 कोटी 75 लाख रुपये, रस्ते व पूल बांधकामासाठी 12 कोटी 14 लाख 92 हजार रुपये, 5054 आदिवासी या शीर्षकाखाली रस्ते व पुलासाठी 16 कोटी एक लाख रुपये, बिगर आदिवासी अनुशेषअंतर्गत रस्ते विकास निधी एक कोटी 64 लाख 56 हजार रुपये, जिल्हा रस्ते निधीतून आदिवासी क्षेत्रासाठी दोन कोटी 62 लाख 75 हजार रुपये, 2515 अंतर्गत पाच कोटी 9 लाख रुपये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते व पुलाच्या बांधकामाकरिता आणलेला निधी 41 कोटी 6 लाख 45 हजार रुपये, पिण्याच्या पाण्याकरिता बोअरवेलसाठी 1 कोटी 62 लाख रुपये, स्थानिक आमदार निधीअंतर्गत दोन कोटी 75 लाख रुपये, चालू वर्षात अर्थ संकल्पात 27 कोटी 84 लाख विविध कामांसाठी मंजूर करण्यात आले. देवरी-आमगाव महामार्गासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमगाव नगर परिषदेची निर्मिती तसेच आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतीत समावेश करण्यात यावा, याकरिता त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
अतिदुर्गम भागांत नाहीत रस्ते, पाणी, आरोग्यसेवा
सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम संवेदनशील दरेकसा माळरानाने व्यापला आहे. या भागातील काही वस्त्या दरीडोंगरात वसलेले आहेत. मुरकुडोह 1, मुरकुडोह 2, मुरकुडोह 3, दंडारी, टेकाटोला ही गावे आदिवासी संस्कृती जपणारे गावे आहेत. दरेकसावरून 10 किलोमीटर अंतरावर जंगलातून वाट काढत या गावांमध्ये जावे लागते. शासकीय अंगणवाडी वगळता कुठलीही सोय या गावांमध्ये नाही. दरेकसा येथील शासकीय रुग्णालयात आजारी रुग्णाला नेण्याकरिता खाटेवर टाकून जंगलाची वाट तुडवत न्यावे लागते. या गावात जाण्याकरिता धड रस्ते नसल्यामुळे कुठलाही शासकीय कर्मचारी येथे पोचत नाही. त्यामुळे कुठलीही शासकीय योजना या गावांमध्ये पोचली नाही. पावसाळ्यात या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. नक्षलग्रस्त भागात या गावांचा समावेश होत असल्याने येथे पोलिस सहसा वेळेवर पोचत नाही. शासकीय यंत्रणा, आरोग्य, रस्ते, पाणी, सुरक्षा आदी बाबींपासून हा भाग अद्याप दूर आहे. हा भाग महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्याला लागून असल्याने हे नक्षल्यांचे गड आहे, या भागाचा ते प्रामुख्याने आसरा म्हणून वापर करतात असे मानले जाते. त्यामुळे या भागात विकासकामे करायला शासन, शासकीय कर्मचारी, कंत्राटदार येथे येत नाहीत. या भागाच्या विकासाकरिता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ताच नाही, तर जाणार कसे
बोदलाबोडी-भजेपार मार्गावरील बाघ नदीवर पूल नाही. कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. परिणामी गंभीर आजारी व गर्भवती मातांना तालुक्याच्या ठिकाणी नेण्याकरिता त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था आहे. महामंडळाची एसटी बस गावांत जात नाही. सालेकसा येथे बसस्थानक नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागते. 30 ते 35 अंगणवाड्या जीर्ण आहेत.
गावाबाहेर बसस्थानक
आमगाव हे बाजाराचे प्रमुख ठिकाण आहे. तालुक्यातील नागरिक बाजाराकरिता या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. परंतु, येथील बसस्थानक गावाबाहेर असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. बसस्थानक गावाजवळ बनविण्यात यावे, याकरिता माजी आमदार रामरतन राऊत यांनी कृषी विभागाच्या जमिनीची मागणी केली होती. नवे बसस्थानक गावाजवळ बनविण्यात यावे, अशी मागणी जनता करीत आहे.
पब्लिक व्हॉइस
- सहषराम कोरोटे, महासचिव जिल्हा कॉंग्रेस गोंदिया.
- सुरेश हर्षे, जिल्हा परिषद सदस्य, आमगाव.
- सुंदर श्रीभाद्रे, सामान्य नागरिक, देवरी.
- राजकुमार चनाप, सामान्य नागरिक, देवरी.
- मुन्ना बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
.........................................
- कृष्णकुमार पटले, भाजप कार्यकर्ता
संकलन - यशवंत शेंडे, राहुल हटवार, नंदूप्रसाद शर्मा, मुरलीधर करंडे.
मंजुरी मिळाली, भूमिपूजन झाले;
आता कामाची प्रतीक्षा
देवरी, आमगाव व सालेकसा या तीन तालुक्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. देवरी आणि आमगाव तालुक्याचा बराचसा भागसुद्धा नक्षलग्रस्त आहे. या तालुक्यांत तीन वर्षांत अनेक विकासकामे शासनाकडून मंजूर झाली. भूमिपूजन झाले. मात्र, बरीच कामे अद्याप शिल्लक आहेत, असे तालुकावासी सांगतात. सालेकसा तालुक्यातील 30 ते 35 अंगणवाड्या आजही जीर्ण आहेत. भजेपार-धानोली बाघनदीवर कोल्हापुरी बंधारा नाही. नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील मुरकुडोह, दंडारी, टेकाटोला ही गावे अजूनही विकासापासून वंचित आहेत. सालेकसा तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रेरणास्थळ "कालीकपार लिंगो' हे देवस्थान तीर्थक्षेत्र झालेच नाही. देवरीच्या एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणू, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाली नाही. आमगाव येथे बसस्थानकाची मागणी अनेक वर्षांपासून रेंगाळलेली आहे.
आमदार म्हणतात,
"सकाळ' हे लोकांना न्याय देणारे वृत्तपत्र आहे. आदिवासी भागांतील प्रश्न आणि नक्षलप्रभावित भागाबाबत विशेष लेखन करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या राजकीय कारकिर्दीत सकाळचा मोठा वाटा आहे.
आश्वासनांची पूर्तता करेन
विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांत बहुतांश लोकोपयोगी कामे हाती घेतली. काही पूर्ण झालीत. काही कामांना लवकरच गती देण्यात येईल. मतदारांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीन, असा विश्वास देतो. विविध विकासकामांकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. देवरी नगरपंचायतीच्या विकासासाठी सात कोटी रुपये, कचारगड पर्यटन क्षेत्रासाठी सात कोटींचा निधी, पालांदूर-चुबळी पुलासाठी तीन कोटी रुपये, आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह विकासासाठी 31 कोटी 75 लाख रुपये, रस्ते व पूल बांधकामासाठी 12 कोटी 14 लाख 92 हजार रुपये, 5054 आदिवासी या शीर्षकाखाली रस्ते व पुलासाठी 16 कोटी एक लाख रुपये, बिगर आदिवासी अनुशेषअंतर्गत रस्ते विकास निधी एक कोटी 64 लाख 56 हजार रुपये, जिल्हा रस्ते निधीतून आदिवासी क्षेत्रासाठी दोन कोटी 62 लाख 75 हजार रुपये, 2515 अंतर्गत पाच कोटी 9 लाख रुपये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते व पुलाच्या बांधकामाकरिता आणलेला निधी 41 कोटी 6 लाख 45 हजार रुपये, पिण्याच्या पाण्याकरिता बोअरवेलसाठी 1 कोटी 62 लाख रुपये, स्थानिक आमदार निधीअंतर्गत दोन कोटी 75 लाख रुपये, चालू वर्षात अर्थ संकल्पात 27 कोटी 84 लाख विविध कामांसाठी मंजूर करण्यात आले. देवरी-आमगाव महामार्गासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमगाव नगर परिषदेची निर्मिती तसेच आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतीत समावेश करण्यात यावा, याकरिता त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
अतिदुर्गम भागांत नाहीत रस्ते, पाणी, आरोग्यसेवा
सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम संवेदनशील दरेकसा माळरानाने व्यापला आहे. या भागातील काही वस्त्या दरीडोंगरात वसलेले आहेत. मुरकुडोह 1, मुरकुडोह 2, मुरकुडोह 3, दंडारी, टेकाटोला ही गावे आदिवासी संस्कृती जपणारे गावे आहेत. दरेकसावरून 10 किलोमीटर अंतरावर जंगलातून वाट काढत या गावांमध्ये जावे लागते. शासकीय अंगणवाडी वगळता कुठलीही सोय या गावांमध्ये नाही. दरेकसा येथील शासकीय रुग्णालयात आजारी रुग्णाला नेण्याकरिता खाटेवर टाकून जंगलाची वाट तुडवत न्यावे लागते. या गावात जाण्याकरिता धड रस्ते नसल्यामुळे कुठलाही शासकीय कर्मचारी येथे पोचत नाही. त्यामुळे कुठलीही शासकीय योजना या गावांमध्ये पोचली नाही. पावसाळ्यात या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. नक्षलग्रस्त भागात या गावांचा समावेश होत असल्याने येथे पोलिस सहसा वेळेवर पोचत नाही. शासकीय यंत्रणा, आरोग्य, रस्ते, पाणी, सुरक्षा आदी बाबींपासून हा भाग अद्याप दूर आहे. हा भाग महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्याला लागून असल्याने हे नक्षल्यांचे गड आहे, या भागाचा ते प्रामुख्याने आसरा म्हणून वापर करतात असे मानले जाते. त्यामुळे या भागात विकासकामे करायला शासन, शासकीय कर्मचारी, कंत्राटदार येथे येत नाहीत. या भागाच्या विकासाकरिता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ताच नाही, तर जाणार कसे
बोदलाबोडी-भजेपार मार्गावरील बाघ नदीवर पूल नाही. कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. परिणामी गंभीर आजारी व गर्भवती मातांना तालुक्याच्या ठिकाणी नेण्याकरिता त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था आहे. महामंडळाची एसटी बस गावांत जात नाही. सालेकसा येथे बसस्थानक नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागते. 30 ते 35 अंगणवाड्या जीर्ण आहेत.
गावाबाहेर बसस्थानक
आमगाव हे बाजाराचे प्रमुख ठिकाण आहे. तालुक्यातील नागरिक बाजाराकरिता या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. परंतु, येथील बसस्थानक गावाबाहेर असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. बसस्थानक गावाजवळ बनविण्यात यावे, याकरिता माजी आमदार रामरतन राऊत यांनी कृषी विभागाच्या जमिनीची मागणी केली होती. नवे बसस्थानक गावाजवळ बनविण्यात यावे, अशी मागणी जनता करीत आहे.
पब्लिक व्हॉइस
आश्वासनांची पूर्तता नाही
आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाकरिता राखीव जागेवरून निवडून आलेले आमदार संजय पुराम यांनी या क्षेत्रात एकही विकासकामे केली नाहीत. 2015-2016 मध्ये या भागात दुष्काळ निर्माण झाला होता. त्यावेळी या भागातील 84 गावांना दुष्काळ निधी मंजूर करून दिल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. दोन वर्षांचा कालावधी होऊनही एकाही शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळाली नाही. निवडणुकीपूर्वी धानाला 3 हजार रुपये हमीभाव देऊ, देवरीच्या एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणू, असे बोलूनसुद्धा आश्वासनांची पूर्तता अजूनपर्यंत करू शकले नाही. सालेकसा तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रेरणास्थळ "कालीकपार लिंगो' या देवस्थानाचा विकास करून मोठे तीर्थक्षेत्र बनविण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु, या ठिकाणी कोणतेही विकासकामे झाली नाहीत. आदिवासींच्या विकासातील अर्थसंकल्पातून पाच हजार कोटी रुपये कर्जमाफी योजनेकडे वळते केले ते आदिवासींच्या हक्काचे पैसे होते, मात्र याबाबत राज्य सरकारला त्यांनी काहीच जाब विचारला नाही, ही शोकांतिका आहे.- सहषराम कोरोटे, महासचिव जिल्हा कॉंग्रेस गोंदिया.
फक्त देवरीचाच विकास
अनेक विकासकामे देवरीपुरतेच मर्यादित आहेत. विविध योजनेचा आलेला निधी अजूनही पडलेला आहे. राज्यस्तरीय दलितवस्ती 25-15 अंतर्गत पिण्याच्या पाण्याची मोठी कामे देवरी तालुक्यापुरतीच मर्यादित आहेत. डी. बी. टी. च्या माध्यमातून औषधी किंवा इतर साहित्य खरेदी केल्यानंतर पाचशे रुपयांच्या सबसीडीच्या अनुदानाकरिता शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. कोटरा, सिरपूर धरणाचे पाणी आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत ओलांडून गोंदिया तालुक्याला मिळते. परंतु, ठरल्याप्रमाणे आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. विधानसभा क्षेत्रामध्ये रस्ते, शाळा, रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे.- सुरेश हर्षे, जिल्हा परिषद सदस्य, आमगाव.
केवळ भूमिपूजनच झाले
गेल्या तीन वर्षांत सर्वसामान्य लोकांच्या हिताचे कोणतीही विकासकामे देवरी तालुक्यात झाली नाही. यात देवरीच्या वॉर्ड क्रमांक दहामध्ये रस्त्याचे भूमिपूजन करून सदर रस्ता आजपर्यंत पूर्ण झालेला नाही.- सुंदर श्रीभाद्रे, सामान्य नागरिक, देवरी.
घरकुलाचा लाभ नाही
लोकप्रतिनिधींनी लोकांच्या फायद्याचे कोणतेही काम केले नाही. यात शासनाने घोषित केलेल्या धोरणानुसार सर्वांना घरकुल मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, घरकुलांचा लाभ अनेकांना अद्याप मिळाला नाही.- राजकुमार चनाप, सामान्य नागरिक, देवरी.
अनेक कामांचे प्रस्ताव तयार
आमगाव खुर्द येथे दहा लाखाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. तिरखेडी ते साकरीटोला मार्गावर नऊ कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. आमदार पुराम यांनी विविध विकासकामे करण्याकरिता अनेक प्रस्ताव तयार केले आहेत. त्यातील अनेक कामांचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित कामांकरिता निधी उपलब्ध करण्याकरिता ते प्रयत्नरत असून, विधानसभा क्षेत्राचा संपूर्ण विकास करण्याचा त्यांचा मानस आहे.- मुन्ना बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
.........................................
निधी मंजूर करण्याकरिता प्रयत्नरत
धानोली येथील ग्रामपंचायत भवनाकरिता निधी मिळवून दिला आहे. जान्हवा येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. दरबडा येथेही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या भागातील विविध कामांची रूपरेषा ठरवून अनेक विकासकामे करण्यात येणार आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या पूर्वी न झालेली अनेक विकासकामे करण्याकरिता व शासकीय निधी मंजूर करण्याकरिता आमदार संजय पुराम नेहमीच प्रयत्नरत राहतात.- कृष्णकुमार पटले, भाजप कार्यकर्ता
संकलन - यशवंत शेंडे, राहुल हटवार, नंदूप्रसाद शर्मा, मुरलीधर करंडे.