*सकाळ आवाहन*
🔔
अतिशय थाटात वाजत गाजत गणरायाचे आपण स्वागत करतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस सारे एकत्र येतो. पुजा-आरती, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात. निरोपाची वेळ येते तेव्हा आपण हळवेही होतो. पुन्हा मिरवणूक, पुन्हा डीजेच्या तालावर थिरकतो. मात्र नेमके अखेरच्या क्षणी जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे आपण गणेशाच्या मुर्तीची अवहेलना करतो. प्रश्न एवढाच की, नऊ दिवस ओसांडूंन वाहणारी श्रद्धा नेमकी दहाव्या दिवशी कुठे हरवते?
मूर्तीचे विसर्जन करणे आणि कशीबशी विल्हेवाट लावणे यातील मुळ फरक अखेरच्या क्षणाला लोक विसरतात. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीचे अवयव विखुरलेले किंवा तरंगत असतात. आपला आवडता बाप्पा अशा अवस्थेत बघून आपले हृदय विरघळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. तलावाच्या काठावर शेवटची आरती झाल्यानंतर गणरायाची होणारी अवहेलना आता चिंतेचा विषय ठरू लागली आहे. हा केवळ नागपूरचा विषय नसून, देशातील बहुतांश शहरांमध्ये हीच स्थिती बघायला मिळते. अनेकांनी सोशल मिडियावरून या संदर्भात आवाज उठवला, जनजागृतीसाठी प्रयत्न केले. *कौस्तुभ मुलमुले नावाच्या एका नागपूरकर तरुणाने "फेसबूक'वरून यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. "आपल्याला पाण्याची भिती वाटते म्हणून चाळीस फूट उंचावरून बाप्पाला आपण खाली फेकून देतो, हीच का आपली श्रद्धा?' असा सवाल करून दुसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगणाऱ्या मूर्ती बघून डोळ्यातून पाणी येणार नाही, एवढी काळजी घ्या, असे आवाहनही त्याने केले आहे.*
"सकाळ'नेदेखील पुढाकार घेतला असून, विसर्जनाच्या वेळी ईश तत्व आणि श्रधेचे भान ठेवण्याचे आवाहन करीत आहे. या आपण *श्रद्धा आणि आस्थेला खऱ्या अर्थाने जागु या... बाप्पाला मनःपूर्वक निरोप देऊ या!*
0 comments:
Post a Comment