- विकासापासून कोसोदूर
- रोजगार, शिक्षणाकरिता शहराकडे धाव
ऑन द स्पॉट लोगो
संदीप गौरखेडे : कोदामेंढी
सुविधांअभावी गावाची रद्दी झाली
गावकऱ्यांना साध्या आगपेटीसाठीही कोदामेंढी किंवा अडेगावलाच जावे लागते. येथील मुले कधी अंगणवाडीमध्ये गेली नाहीत. सातवीपर्यंतचे शिक्षण अडेगावला, तर पुढील शिक्षणासाठी अरोली - कोदामेंढीशिवाय पर्याय नाही. मात्र, पावसाळयात येथील विद्यार्थ्यांची मोठी फजीती होते. निवडणुकीच्या वेळी वोट मागायला येतात. बाकी वेळेला कुणीही फिरकुन पहात नाही. आमचं गाव रद्दी म्हणून फेकलेला आहे, अशी खंत पुष्पाबाई मदारकर यांनी बोलून दाखविली.
पाटलांची सोडले गाव
खापरखेडा (जंगली) येथे उच्च जातीय पाटिल राहायचे. गावात कामधंदा नसल्याने आणि शिक्षणाकरिता शहराकडे गेले. गावात आवक -जावक नसल्याने त्यांनी गावही सोडले. आता त्यांची शेती आहे. ती सालगडी बघतात. काटकोनात कंबर वाकलेल्या अंशीच्या वयातील सुभी पंधरे ही वयोवृद्ध महिला गावातील जुन्या आठवणी सांगत होती.
मुलभूत सुविधांचा अभाव
गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. शेळ्या व गुरेढोरे पाळतात. शेती करण्याकरीता कालव्याचे पाणी मिळण्याची सुविधा आहे. रानडुकर, हरिण आदी जंगली प्राण्यांचा हैदोस वाढलेला आहे. त्यामुळे शेतातील उभे पिक उद्धवस्त होत आहे.पावसाळयात पूर्ण घरे पाण्यानी वेढलेली असतात. झाडेझुडपी असल्याने विंचु सापाबरोबरच जंगली प्राण्याची भिती असते.
शासकीय योजनेचा लाभ गावाला अद्यापही मिळाला नाही. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते याकडेही भांडेवाडी ग्रामपंचायतीने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. एकीकडे डिजीटल इंडिया, शायनींग इंडीया चे स्वप्न पहात असतांनी खापरखेडा (जंगली) गांव दुर्लक्षित असल्याने गाव भकास झाले आहे.
शासकीय योजनांचा लाभ नाही
गावात 20 वर्षांपूर्वी 28 हजारात घरकुल योजनेत चार घरे मिळाली. तेव्हापासून गावात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. गावकऱ्यांकडे रेशन कार्ड आहे. मात्र, त्यांना धान्य अथवा रॉकेल यापैकी काहीही मिळत नाही. सुभी पंधरे, गंगुबाई तांबे, रत्नाबाई बावनगडे या 80 वर्ष वयोगटातील महिलांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत पेंशन मिळत नाही.
लोकप्रतिनिधींना जरा सांगा
गावात विकास नाही. लोकप्रतिनिधी कधी येत नाही. जरा त्यांना सांगा, अशी विनंती अनिता बावनगडे या करीत होत्या.
विज व गृहकर वसूल करायला वर्षातून एकदा येतात. गावात सिमेंट रस्ते बनवू, यासाठी मोजमाप करण्यात आले. दोन वर्ष झालीत. मात्र, रस्ता अद्याप झाला नाही, असे काजू पंधरे यांनी सांगितले.
हाताला काम नाही
जानबा, मनिराम, मोनू, विठ्ठल या चार पिढ्या इथल्याच आहेत. माझा जन्म इथलाच आहे. आमचे देव धर्म येथेच आहे. नारायणदेव, वाघदेव, शंकर पार्वतीदेव, गोरखनाथ, झाडावरचे देव आदींची पूजा केली जाते. तीन वर्ष जंगलाची रोजंदारीवर देखरेख केली. आता वनविभागाने काढल्याचे काजू पंधरे सांगत होते.
सरपंचही गावात येईना
डांबरीकरण नाही, सिमेंट रस्ता नाही. सरपंच अजुनही फिरकले नाही. पाणी तपासून नेत नाही. हाताला काम नाही. निवडणूक व्यतिरीक्त कुणीही येत नाही, असे मिनाक्षी तांबे म्हणाल्या.
--------------------
गावाचे काही नियोजन तर नाही. मात्र ठक्कर योजनेअंतर्गत दोन सिमेंट रस्ते नियोजित आहेत. हातपंपाजवळ एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसविण्याचे नियोजन केले असून, सहा महिन्यांआधी पाठविले आहे.
- राजकुमार गजभिये, सचिव गटग्रामपंचायत भांडेवाडी
गावातील रस्ते पाठविले आहे. हातपंपाजवळ पाण्याची सिंटेक्स टाकी लावू.
- मंगला देशमुख, प्रभारी सरपंच गटग्रामपंचायत भांडेवाडी
0 comments:
Post a Comment