पोलिस राजन माने
मो. 8108675050
पोलिस विभागात असूनही सामाजिक जाणीव ठेवून काम करणारे अनेक अधिकारी आहेत. त्यांना वारसाहक्कानेच सामाजिक वसा मिळालेला असतो. असाच वसा धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन माने पुढे चालवीत आहेत. आई-वडील वारकरी. मुख्य व्यवसाय शेती. पंढरपूरला पायी जाणाऱ्यांची अविरत सेवा आणि गरिबांच्या मुलांना शालेय साहित्य वाटपाची परंपरा. तीच परंपरा मुलगा राजनही पुढे नेत आहे. दुर्गोत्सव व गणेशोत्सवादरम्यान मंडळ तसेच स्वतःसह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य तसेच अन्य सामग्री ते वाटतात. त्यांच्या विशिष्ट तपासशैलीबद्दल ते पोलिसांत प्रसिद्ध आहेत.
राजन आबाजी माने मूळचे सोलापूरमधील पेनूर गावचे. वडिलांसह शेतीकाम करीत त्यांनी शिक्षण घेतले. मूळ कुस्तीपटू असलेल्या माने यांनी शालेय आणि महाविद्यालयात असताना अनेक कुस्तीस्पर्धा गाजवल्या. इंग्रजी साहित्यामधून पदवी घेतल्यानंतर शिवाजी विद्यापीठातून एमए (इतिहास)मध्ये प्रथम क्रमांक. मुलगा प्राध्यापक व्हावा, अशी आईची इच्छा होती. तर पोलिस अधिकारी असलेले मामा कुबेर चवरे यांनी एमपीएससीची तयारी करण्यास सांगितले. द्विधामन:स्थितीत त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. योगायोगाने 1992 ला एकाच दिवशी प्राध्यापक आणि पीएसआय म्हणून सिलेक्शन झाले. मामानंतर गावातील पहिलाच पोलिस अधिकारी झाल्याने सर्वत्र कौतुक झाले. पोलिस विभागाची निवड केली आणि पहिलीच पोस्टिंग मुंबईतील शिवाजीनगर ठाण्यात झाली. 2000 मध्ये कांदिवली येथे प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून ऍसिड हल्ला केला होता. यात तीन मुलांसह 7 जण जखमी झाले. या संवेदनशील प्रकरणात गुजराती संघटनेने आंदोलन केले होते. डिटेक्शन अधिकारी म्हणून आरोपीला अटक करण्याची जबाबदारी. त्यांनी साध्या वेशात गुजरातमध्ये पाच दिवस मुक्काम केला. जवळचे पैसे संपल्याने गळ्यातील सोनसाखळी विकून जेवणाची व्यवस्था केली. सहाव्या दिवशी आरोपीला अटक केली. या कामगिरीची दखल मुंबईच्या आयुक्तांनी घेतली. छोटा राजनचा हस्तक आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ओ. पी. सिंगच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. मुंबईत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना रोजगार मिळवून दिला. हत्याकांडात 10 वर्षांची शिक्षा भोगून आलेल्या चौघांना वडापाव ठेला, हातठेला, चायनीज ठेला तसेच दुधाचा व्यवसाय टाकून दिला. ते चौघेही माने यांचे खबरे बनले. कर्तव्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष देणे झाले नाही. परंतु, पत्नी स्नेहलता यांनी आईसोबत बाबांचीही भूमिका पार पाडली. त्यामुळे जुळे असलेले साक्षी आणि सिद्धांत दहावीत मेरिटमध्ये आले.
माने यांना नागपुरातून 40 रिवॉर्ड आणि 63 प्रशस्तिपत्र मिळाले. त्यांना नुकताच डॉक्टर्स असोसिएशनने "सामाजिक कार्यकर्ता' पुरस्कार प्रदान केला. दीक्षाभूमी बंदोबस्ताची जबाबदारी त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली. 2001 मध्ये मुंबईत सारस्वत बॅंक लुटणाऱ्या आठपैकी सात जणांना अटक केली. मात्र, आठवा तलवार घेऊन पळत होता. माने यांनी त्याचा एक किमीपर्यंत पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा माने यांनी पिस्तूल काढले. जिवंत पकडायचे असल्याने त्यांना लगेच त्याला खाली पाडून अटक केली. सध्या ते धंतोली पोलिस ठाण्यात ठाणेदार आहेत.
मो. 8108675050
पोलिस विभागात असूनही सामाजिक जाणीव ठेवून काम करणारे अनेक अधिकारी आहेत. त्यांना वारसाहक्कानेच सामाजिक वसा मिळालेला असतो. असाच वसा धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन माने पुढे चालवीत आहेत. आई-वडील वारकरी. मुख्य व्यवसाय शेती. पंढरपूरला पायी जाणाऱ्यांची अविरत सेवा आणि गरिबांच्या मुलांना शालेय साहित्य वाटपाची परंपरा. तीच परंपरा मुलगा राजनही पुढे नेत आहे. दुर्गोत्सव व गणेशोत्सवादरम्यान मंडळ तसेच स्वतःसह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य तसेच अन्य सामग्री ते वाटतात. त्यांच्या विशिष्ट तपासशैलीबद्दल ते पोलिसांत प्रसिद्ध आहेत.
राजन आबाजी माने मूळचे सोलापूरमधील पेनूर गावचे. वडिलांसह शेतीकाम करीत त्यांनी शिक्षण घेतले. मूळ कुस्तीपटू असलेल्या माने यांनी शालेय आणि महाविद्यालयात असताना अनेक कुस्तीस्पर्धा गाजवल्या. इंग्रजी साहित्यामधून पदवी घेतल्यानंतर शिवाजी विद्यापीठातून एमए (इतिहास)मध्ये प्रथम क्रमांक. मुलगा प्राध्यापक व्हावा, अशी आईची इच्छा होती. तर पोलिस अधिकारी असलेले मामा कुबेर चवरे यांनी एमपीएससीची तयारी करण्यास सांगितले. द्विधामन:स्थितीत त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. योगायोगाने 1992 ला एकाच दिवशी प्राध्यापक आणि पीएसआय म्हणून सिलेक्शन झाले. मामानंतर गावातील पहिलाच पोलिस अधिकारी झाल्याने सर्वत्र कौतुक झाले. पोलिस विभागाची निवड केली आणि पहिलीच पोस्टिंग मुंबईतील शिवाजीनगर ठाण्यात झाली. 2000 मध्ये कांदिवली येथे प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून ऍसिड हल्ला केला होता. यात तीन मुलांसह 7 जण जखमी झाले. या संवेदनशील प्रकरणात गुजराती संघटनेने आंदोलन केले होते. डिटेक्शन अधिकारी म्हणून आरोपीला अटक करण्याची जबाबदारी. त्यांनी साध्या वेशात गुजरातमध्ये पाच दिवस मुक्काम केला. जवळचे पैसे संपल्याने गळ्यातील सोनसाखळी विकून जेवणाची व्यवस्था केली. सहाव्या दिवशी आरोपीला अटक केली. या कामगिरीची दखल मुंबईच्या आयुक्तांनी घेतली. छोटा राजनचा हस्तक आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ओ. पी. सिंगच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. मुंबईत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना रोजगार मिळवून दिला. हत्याकांडात 10 वर्षांची शिक्षा भोगून आलेल्या चौघांना वडापाव ठेला, हातठेला, चायनीज ठेला तसेच दुधाचा व्यवसाय टाकून दिला. ते चौघेही माने यांचे खबरे बनले. कर्तव्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष देणे झाले नाही. परंतु, पत्नी स्नेहलता यांनी आईसोबत बाबांचीही भूमिका पार पाडली. त्यामुळे जुळे असलेले साक्षी आणि सिद्धांत दहावीत मेरिटमध्ये आले.
माने यांना नागपुरातून 40 रिवॉर्ड आणि 63 प्रशस्तिपत्र मिळाले. त्यांना नुकताच डॉक्टर्स असोसिएशनने "सामाजिक कार्यकर्ता' पुरस्कार प्रदान केला. दीक्षाभूमी बंदोबस्ताची जबाबदारी त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली. 2001 मध्ये मुंबईत सारस्वत बॅंक लुटणाऱ्या आठपैकी सात जणांना अटक केली. मात्र, आठवा तलवार घेऊन पळत होता. माने यांनी त्याचा एक किमीपर्यंत पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा माने यांनी पिस्तूल काढले. जिवंत पकडायचे असल्याने त्यांना लगेच त्याला खाली पाडून अटक केली. सध्या ते धंतोली पोलिस ठाण्यात ठाणेदार आहेत.
0 comments:
Post a Comment