16 Aug 2017

दिवसभरातील बातम्यांवर एक नजर

16/08/2017
 
  • पाचपावलीतील कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि बिर्याणी हॉटेल मालक अब्दुल्ला खान सईमुल्ला खान यांचा 10 ते 12 जणांनी भरचौकात तलवारीने वार करून खून केला, तर त्यांच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
  • केंद्रीय प्रवेश समितीमार्फत सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत चौथ्या फेरीतील पहिल्या ऑप्शनच्या प्रवेश गुरुवारी संपल्यावर शुक्रवारपासून विशेष फेरी होत आहे. रविवारपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करावयाची होती. मात्र, या फेरीलाही अल्प प्रतिसाद देत केवळ एक हजार 595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आता उद्या गुरुवारपासून (ता. 17) तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.
  • 2015 मध्ये दुष्काळग्रस्त घोषित गावांना अद्‌याप नुकसानभरपाई का देण्यात आली नाही, अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारला केली. त्यावर दोन महिन्यांत उत्तर मागितले असून, दरम्यानच्या काळात नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेत.
  • - शहरात कुठेही पार्किंग नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी त्याबाबत हायकोर्ट प्रबंधकांकडे छायाचित्रांसह तक्रार करावी, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जाहीर केले. त्यासाठी महानगर पालिका, आरटीओ, पोलिस व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती अभियान राबवावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.
  • -येत्या गुरुवारपासून तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता जवळपास महिनाभरापासून पावसाचा खंड असल्याने उकाडा जाणवत आहे.
  • दारूबंदीबाबत ज्या आठ राज्यांतील रस्ते वगळण्यात आले, त्याचा अभ्यास सुरू असून, बंदीनंतर दारू विक्री घटली की वाढली याचा विचार करून दारू बंदीबाबत एक महिन्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
  • भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त पीस फॉर ह्यूमॅनिटी या संस्थेने राष्ट्रीय एकता संमेलन घेतले. यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ईसाई धर्माचे विचारवंत उपस्थित होते. टिपू सुलतान चौक येथील सभागृहात झालेल्या एकता संमेलनात भन्ते ज्ञानबोधि यांनी समतेचा विचार ठेवा व संविधान सक्षम करण्याचे आव्हान केले.
  • सविस्तर बातम्यांसाठी वाचा उद्याचा सकाळ

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates